राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९४७ मध्येही कोणतीही भूमिका घेतली नाही. आता एप्स्टीन फाईल्समध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतरसुद्धा आरएसएसने कोणतीच भूमिका घेतली नाही. ज्याला चारित्र्य नाही असा प्रांत्प्रधान तुम्हाला चालतो का? अशा अनेक प्रश्नांचा रा. स्व. संघाला आरएसएसला जाब विचारण्यासाठी आम्ही २३ मार्च या दिवशी मोर्चा काढणार आहोत, असं तारखेला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवार दि. १३ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी मध्यमवर्गीयांना आवाहन करतो की, जे लोण आता आपल्याला भारतात येताना दिसत नाही ते भारतात आपल्याला दिसेल. यासाठी आपण सर्वांनी भूमिका घ्यावी. समझोता केलेल्या पंतप्रधानाला बाजूला सारलं पाहिजे. त्यांना राजीनामा द्यायला लावलं पाहिजे. यासाठी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा भूमिका घ्यायला लावू. यासाठी आम्ही नागपूरमध्ये २३ मार्च रोजी आंदोलन करणार आहोत. यात सर्व समाजाने सामील व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो.

आज आपल्याला जो इंधनाचा तुटवडा पाहायला मिळत आहे तो भारताने अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही म्हणून निर्माण झाला आहे. कदाचित आमचा मोर्चा निघेपर्यंत बँकांमधली परिस्थिती सुद्धा बिघडलेली असेल असं सध्याचं चित्र आहे. हे जर सर्व थांबवायचं असेल तर समझोता करणारे, अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारे नरेंद्र मोदी यांना या पदावरून हटवलं पाहिजे तरच ही परिस्थिती सामान्य होऊ शकेल, असंही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मध्यमवर्गाला दिला भविष्यातील घातक इशारा

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मध्यमवर्गीयाला सांगू इच्छितो की, खोट्या नेरेटीवमध्ये अडकू नका. इथल्या उच्चवर्णीय मध्यमवर्गीय लोकांना सांगितलं जातं की, मोदी आपल्या जातीचं वर्चस्व कायम ठेवतील. पण मी सांगतो की, मोदी असं काही करू शकणार नाहीत. पण एक धोक्याचा इशारा देऊन ठेवतो की, एप्स्टीन फाईल या प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि ब्लॅक मेलिंग झालेलं आहे हे लक्षात घ्या. आपल्यालाकडे आधीच अनेक मुली गायब होत आहेत. त्या प्रामुख्याने लग्नासाठी पळवल्या जातात. तेही वाईटच आहे. पण सेक्स रॅकेटसाठी पळवण्याचा प्रकार नगण्य आहे. पण उच्चभ्रू वर्गात जर हा सेक्स रॅकेटचा प्रकार सुरू झाला तर मध्यमवर्ग हा त्याचा मोठा बळी ठरेल हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला शोषण आणि दुसऱ्या बाजूला स्वत:ची इभ्रत अशा कात्रीमध्ये हा मध्यमवर्गीय समाज अडकलेला आहे. त्यांना मी सांगतो की, देशाची इभ्रत ही स्वत:ची इभ्रत आहे हे समजून घ्या आणि या मोर्चामध्ये सामील व्हा.